Sunday, 29 August 2021

गोपाळकाला - श्री कृष्ण जन्माष्टमी

         गोपाळकाला - श्री कृष्ण जन्माष्टमी -पनवेल ची पारंपरिक दहीहंडी  

                जेव्हा जेव्हा धरतीवर अन्याय,अनीती, अधर्म वाढत गेला तेव्हा तेव्हा भगवंतांनी मानवाच्या कल्याणाकरिता धर्तीवर अवतार घेतले .

         भगवान श्री विष्णूंनी मानवाच्या कल्याणाकरिता अनेक अवतार घेतले , पण श्री कृष्ण हा अवतार सगळ्यात प्रभावी , जनमान्य आणि सर्वाना हवाहवासा ठरला.प्रत्येक आईला वाटत आपले मूल कृष्णासारखे खोडकर असावे , प्रत्येक तरुणीला वाटत आपल्यालाही राधेप्रमाणे  कृष्णसखा  मिळावा, प्रत्येक माणसाला वाटत आपल्यालाही सुदाम्याप्रमाणे कृष्णासारखा मित्र मिळावा . आयुष्याचे पेच सोडवताना प्रत्येकाला वाटत की  आपल्यालाही पार्थ प्रमाणे सारथी म्हणून श्री कृष्ण लाभावा . त्यामुळेच आज हजारो वर्षांनंतर हि या युगपुरुषाचा ठसा जन माणसावरून जराही पुसट झालेला नाही .

shri krishna  

        श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी या नक्षत्रावर मथुरेत  कंसाच्या बंदी शाळेत श्री कृष्णाचा माता देवकीच्या पोटी जन्म झाला . नंतर पिता वासुदेवाने श्री कृष्णाला गोकुळात नंद व यशोदेकडे श्री कृष्णाला आणून सोडले. कृष्णजन्म म्हणजेच गोकुळाष्टमी . श्री कृष्ण जयंती जन्माष्टमी या नावाने हि हा दिवस साजरा केला जातो .

       भारता मध्ये सर्वत्र जन्माष्टमीच्या उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. उत्तर भारत, ईशान्य भारत , व गुजरात मध्ये हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करतात . महाराष्ट्रात जन्माष्टमी दहीहंडी उत्सवासोबत साजरी केली जाते.

            काला म्हणजे दही , दूध , लोणी हे सारे पदार्थ एकत्र करून केलेला पदार्थ. म्हणूनच याला दहीकाला असेही म्हणतात. श्री कृष्णाने वृंदावनातून सर्व बालगोपाळांच्या शिदोऱ्या एकत्र करून सर्व पदार्थांचा एकत्र काला केला . याच गोष्टीवरून गोकुळअष्टमीच्या दुसऱ्या दिवशी काला करण्याची व दहीहंडी फोडण्याची प्रथा पडली.श्री कृष्णाची हि कृती म्हणजे समाजातील भेदाभेद , श्रेष्ठ - कनिष्ठ  या कल्पनांना छेद देऊन समानतेचे तत्त्व आहे .

     गोपाळ म्हणजे गायीचे पालन करणारा , काला म्हणजे एकत्र मिसळणे , गोपालन करणाऱ्या कृष्णाच्या या जन्मोत्सवाच्या निमित्ताने काल्याचा प्रसाद केला जातो .

महाराष्ट्रात हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. मुख्यतः मुंबई, ठाणे , नवी मुंबई,  च्या भागात पथक मधील सारे गोविंदा उंचच उंच थर रचून हंडी फोडतात . 

Dahihandi 

पनवेल ची पारंपरिक दहीहंडी 

    दहीहंडी म्हटले कि आम्हा पनवेलकरांचा उत्सव . पनवेल मधील बापट वाडा येथील दहीहंडीला ऐतिहासिक महत्व असून १७३० पासून हा सण परंपरेनुसार आज हि सुरु आहे . पनवेल शहरात नवनाथांची शक्तिपीठे आहेत . या ठिकाणचे नवनाथ भक्त या उत्सवात सामील होतात . येथील दहीहंडीला ना लाखोंची बक्षिसे असतात ना गोविंदांचे उंचच उंच थर लागतात .  ६ ते ७ फुटांच्या उंचीवर येथे हंड्या टांगल्या जातात . नवनाथ भक्त हंडीभोवती गोलाकार जमतात .त्यानंतर पारंपरिक पद्धतीनुसार ही दहीहंडी एका काठीने फोडली जाते.  जमलेल्या गोविंदांना आसुडाचे (जाडा दोरखंड) फटके मारले जातात. हा

पनवेल ची दहीहंडी 



एक परंपरेचाच भाग आहे . पनवेल मध्ये बापट वाडा , लाईन आळी, परदेशी आळी या भागात अशा प्रकारची दहीहंडी पाहायला मिळतात. 

 जवळपास ३०० वर्षांपासून पनवेल तालुक्यातील अनेक गावांमध्ये अशी पारंपरिक पद्धतीने दहीहंडी साजरी करतात .

गावची दहीहंडी 

                       

गाव ची दहीहंडी 

       आमच्या येथे कोळखे गावात हि अशाच प्रकारची हंडी पाहायला मिळते. नारळी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसापासून गावातील मंदिरात हरिनाम सप्ताह बसवला जातो . श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे ८ दिवस पूजन केले जाते . गोपाळकाल्याच्या दिवशी काल्याच्या महाप्रसादाने या सप्तहाची सांगता होते . या सात दिवसात मंदिरात भजन , कीर्तन , हरिपाठ असे भक्तिमय वातावरण असते . या संपूर्ण आठवड्यात  आळीपाळीने गावातील प्रत्येकजण  मंदिरातील वीणेचे वादन करीत असतो , सप्ताह बसल्यापासून गोपाळकाल्यापर्यंत वीणा खाली न ठेवण्याची प्रथा आहे . गोपाळकाल्याच्या दिवशी  पारंपरिक पद्धतीनुसार दहीहंडी एका काठीने फोडली जाते.  जमलेल्या गोविंदांना आसुडाचे (जाडा दोरखंड) फटके मारले जातात. 

" देवाची हंडी '' असे या दहीहंडीला म्हणतात . 

सर्वांन गोकुळ अष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा...

राम कृष्ण हरी 🙏🏻🌺

नवनाथ भक्त 






    

Friday, 20 August 2021

तुळस - तुळशीचे औषधी फायदे



 तुळस - तुळशीचे औषधी  फायदे

 ( तुलसी, basil , tulsi, holy basil  )



                                  तुलसी श्री सखी शुभे 
                                   पाप हारींनी पुण्य दे 
                                   नमस्तेय नारदमुने 
                                   नारायणी मनप्रिये 
Tulsi


     

 

                आपल्या हिंदू धर्मात प्रत्येकाच्या दारापुढे तुळस असते . रोज आपल्याकडे तुळशीची पूजा केली जाते . तुळस हि विष्णुप्रिय आहे .भगवान विष्णूंचा कोणताही नैवेद्य तुळशीच्या पानाशिवाय पूर्ण होत नाही . तुळशी पूजनाशिवाय नित्य पूजा पूर्ण होऊ शकत नाही . तुळशीच्या पूजनाने भगवान विष्णू संतुष्ट होतात . 

       तुलसी मातेस पाणी घालणारे सदा सर्व काळ सुखी होतात . तुलसी पूजा भक्तिभावे करणारे सारेच जण श्री कृष्ण प्रिय म्हणजेच भगवान विंष्णूचे प्रिय होतात . वारकरी आणि तुळशीचं नातं तर जगावेगळं आहे . वारकर्यांची खरी ओळख हि त्याच्या गळ्यातील तुळशीमाळ मुळेच असते . ज्याच्या दारापुढे तुळशी वृंदावन आहे देव त्याला कधीच विसरत नाही.

              तुळस जशी देवपूजनात महत्वाची तसेच तिचे अनेक औषधी गुणधर्मही आहेत. तुळस आपल्या आसपासची नकारात्मक ऊर्जा शोषून घेते व वातावरण सकारात्मक बनवते . तुळशीच्या पानात ऑक्सिजन ची मात्र भरपूर प्रमाणात आढळते . 

तुळशीचे अनेक प्रकार आहेत . 

  •  कृष्ण तुळस
  •  राम तुळस
  • रान तुळस 
  • लवंगी तुळस 
  • कापूर तुळस 
   आपल्याकडे मुख्यतः दोन प्रकार जास्त प्रमाणात पाहावयास मिळतात . राम तुळस व कृष्ण तुळस .

राम तुळस , Ram Tulas 

कृष्ण तुळस , krushna Tulas 
  

 प्रत्येक तुळशीचा गुणधर्म हा वेगवेगळा आहे . त्यात हि लाल रंगाची कृष्ण तुळस हि सर्वप्रिय आहे . 

                      सफेद रंगाची राम तुळस हि शीतवर्णी तर लाल रंगाची कृष्ण तुळस हि उष्णवर्णी असते . राम तुळशीचा वास हा सामान्य असतो तर कृष्णतुळसीचा वास हा उग्र असतो . उन्हाळ्यात जर आपल्याला सरबत काढा रस करायचा असेल तर त्यात
रामतुळशीच्या पानांचा वापर करावा . थंडीच्या दिवसांमध्ये आपल्याला चहा काढा यामध्ये कृष्णतुळशीच्या पानांचा वापर करावा .   

 तुळशीचे घरगुती फायदे

२०० हुन अधिक आजारांपासून तुळस आपले रक्षण करते .

  • तुळशीमध्ये खूप सारे अँटिऑक्सिडेन्ट आणि अँटीबॅक्टरील प्रॉपर्टीस असतात , जे आपल्या आरोग्यासाठी फार चांगले असतात. 
  • तुळस हि आपल्याला कॅन्सर सारख्या भयानक आजारापासून दूर ठेवते , तुळशीची पाने रोज चावून खाल्ल्यास कॅन्सर होण्याची शक्यता कमी होते .
  • तुळशीची पाने रोज चावून खाल्ल्यास ब्लड प्रेशर कंट्रोल मध्ये राहतो .
  • जर सर्दी , खोकला , डोकेदुखीने त्रस्त असाल तर तुळशीच्या काढ्याने आराम मिळतो .
  • तुळशीची पाने चावून खाल्ल्याने आपली श्वसन क्रिया सुरळीत होते .
  • तुळशीचा रस खाज, खरूज , त्वचा विकारांवर परिणामकारक ठरतो .
  • जीवनसत्व अ, ब, आणि अनेक पोषक तुळशीत आहेत . तुळशीचे तेल एक जैवप्रतिविरोधी आणि प्रतिरोधी मानले जाते 
  • किडा चावल्यास , जखम झाल्यास , पिंपल्स , काळे डाग यावर तुळशीच्या पानांचा रस फायदेशीर ठरतो .
  • केस गळणे, केस पीकणे ,कोंडा होणे यावर तुळशीचा अर्क परिणामकारक ठरतो .
  • कान दुखीवर तुळशीचा पानांचा रस गरम करून कानात १/२ थेंब घातल्याने आराम मिळतो .
  • दात दुखी , मुख दुर्गंधी अशी समस्या असेल तर कोमट पाण्यात तुळशीच्या अर्काचे थेंब घालून गुळण्या केल्यास फरक जाणवतो .

          त्यामुळेआयुर्वेदामध्ये   याचा वापर अनेक औषधांमध्ये केला जातो . भारतामध्ये तुळशीला घरघुती औषधांचा भांडार मानले जाते .


Monday, 2 August 2021

दीप पूजन ( दर्श अमावस्या ) 🪔🌺🙏🏻

 दीप पूजन  ( दर्श अमावस्या ) 🪔🌺🙏🏻


                           शुभं करोति केल्यानं आरोग्यम धनसंपदा ।

                           शत्रुबुद्धी विनाशाय दीप काय नमोस्तुते ॥

                           दीपो ज्योती पर ब्रम्ह दीपो ज्योती जनार्दन ।

                            दीपो हारतु मी पाप संध्यादिप नमोस्तुते ॥

                  

                  दीप हे मांगल्याचे प्रतीक , दीप हा अंधाराचा नाशक , मग अंधार झाल्यावर घरात लावलेला कंदील असो , देवासमोर तेवणारी समई असो , औक्षण करणारी पंचारती असो , अथवा तुळशीसमोर लावलेली पणती असो, कोणत्या न कोणत्यारूपात दिवा आपल्या सभोवतालचा नाधर दूर करत असतो . आपल्या हिंदू संस्कृती मध्ये दिव्याला अनन्यसाधारण  महत्व आहे . अन याच दिव्याविषयी कृतज्ञता म्हणून दीप अमावस्या साजरी केली जाते . 

       दीप अमावास्येच्या दुसऱ्या दिवशी पासून श्रावण मास चालू होतो . अनेक जण हि अमावस्या गटारी अमावस्या म्हणून साजरी करताना दिसतात . पुढे श्रावण महिनाभर मांसाहार खाणे निषिद्ध असल्याने या दिवशी म्हणजे आषाढ अमावास्येला मांसाहारावर मनसोक्त ताव मारण्याचा अनेकांचा कल असतो. सध्या गटारी अमावस्या हे नाव इतके प्रचलित झाले आहे कि या दिवशी दीप अमावस्या असते हे देखील अनेकांना माहिती नसते . गटारी अमावास्याचे नादात  अनेक जण आपली संस्कृती विसरताना दिसतायेत. 

Dip Pujan 


          दिवा हा मांगल्याचे प्रतीक आहे . या दिवशी दिव्यांची आरास केली जाते . हि पूजा संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी करावी .  दीप अमावस्येची पूजा विधी पुढीलप्रमाणे :

  •  सर्वात आधी जमीन स्वच्छ पुसून घ्यावी .
  •  जमिनीवर पाट ठेवून पाटावर स्वस्तिक काढावे .
  •  घरातील सर्व दिवे सवच्छ धुवून व पुसून घ्यावेत .
  •  पाटावर या सर्व दिव्यांची आरास करावी .
  •  पाट सभोवती रांगोळी काढावी.
  •  दिव्यांना फुल , गंध , अक्षता वाहाव्यात .
  •  गोडाचा किंवा खडीसाखरेचा नैवेद्य दाखवावा .

 नमस्कार करून प्रार्थना करावी व पुढील मंत्र म्हणावा 


         🙏🏻🌺🪔  ''दीप सूर्याग्निरुपस्त्वं तेजसां तेज उत्तमम्‌ गृहाण मत्कृतां पूजां सर्वकामप्रदो भव॥ 🪔🌺🙏🏻


          माझी सर्वांना नम्र विनंती आहे की आपण सर्वांनी या दिवशी आपल्या घरातील दिव्यांची पूजा करून आपली मंगलमय संस्कृती जपूया !


सर्वांना दीप अमावास्येच्या हार्दिक शुभेच्छा !🪔🌺🙏🏻