गोपाळकाला - श्री कृष्ण जन्माष्टमी -पनवेल ची पारंपरिक दहीहंडी
जेव्हा जेव्हा धरतीवर अन्याय,अनीती, अधर्म वाढत गेला तेव्हा तेव्हा भगवंतांनी मानवाच्या कल्याणाकरिता धर्तीवर अवतार घेतले .
भगवान श्री विष्णूंनी मानवाच्या कल्याणाकरिता अनेक अवतार घेतले , पण श्री कृष्ण हा अवतार सगळ्यात प्रभावी , जनमान्य आणि सर्वाना हवाहवासा ठरला.प्रत्येक आईला वाटत आपले मूल कृष्णासारखे खोडकर असावे , प्रत्येक तरुणीला वाटत आपल्यालाही राधेप्रमाणे कृष्णसखा मिळावा, प्रत्येक माणसाला वाटत आपल्यालाही सुदाम्याप्रमाणे कृष्णासारखा मित्र मिळावा . आयुष्याचे पेच सोडवताना प्रत्येकाला वाटत की आपल्यालाही पार्थ प्रमाणे सारथी म्हणून श्री कृष्ण लाभावा . त्यामुळेच आज हजारो वर्षांनंतर हि या युगपुरुषाचा ठसा जन माणसावरून जराही पुसट झालेला नाही .
![]() |
shri krishna |
श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी या नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदी शाळेत श्री कृष्णाचा माता देवकीच्या पोटी जन्म झाला . नंतर पिता वासुदेवाने श्री कृष्णाला गोकुळात नंद व यशोदेकडे श्री कृष्णाला आणून सोडले. कृष्णजन्म म्हणजेच गोकुळाष्टमी . श्री कृष्ण जयंती जन्माष्टमी या नावाने हि हा दिवस साजरा केला जातो .
भारता मध्ये सर्वत्र जन्माष्टमीच्या उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. उत्तर भारत, ईशान्य भारत , व गुजरात मध्ये हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करतात . महाराष्ट्रात जन्माष्टमी दहीहंडी उत्सवासोबत साजरी केली जाते.
काला म्हणजे दही , दूध , लोणी हे सारे पदार्थ एकत्र करून केलेला पदार्थ. म्हणूनच याला दहीकाला असेही म्हणतात. श्री कृष्णाने वृंदावनातून सर्व बालगोपाळांच्या शिदोऱ्या एकत्र करून सर्व पदार्थांचा एकत्र काला केला . याच गोष्टीवरून गोकुळअष्टमीच्या दुसऱ्या दिवशी काला करण्याची व दहीहंडी फोडण्याची प्रथा पडली.श्री कृष्णाची हि कृती म्हणजे समाजातील भेदाभेद , श्रेष्ठ - कनिष्ठ या कल्पनांना छेद देऊन समानतेचे तत्त्व आहे .
गोपाळ म्हणजे गायीचे पालन करणारा , काला म्हणजे एकत्र मिसळणे , गोपालन करणाऱ्या कृष्णाच्या या जन्मोत्सवाच्या निमित्ताने काल्याचा प्रसाद केला जातो .
महाराष्ट्रात हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. मुख्यतः मुंबई, ठाणे , नवी मुंबई, च्या भागात पथक मधील सारे गोविंदा उंचच उंच थर रचून हंडी फोडतात .
![]() |
Dahihandi |
पनवेल ची पारंपरिक दहीहंडी
दहीहंडी म्हटले कि आम्हा पनवेलकरांचा उत्सव . पनवेल मधील बापट वाडा येथील दहीहंडीला ऐतिहासिक महत्व असून १७३० पासून हा सण परंपरेनुसार आज हि सुरु आहे . पनवेल शहरात नवनाथांची शक्तिपीठे आहेत . या ठिकाणचे नवनाथ भक्त या उत्सवात सामील होतात . येथील दहीहंडीला ना लाखोंची बक्षिसे असतात ना गोविंदांचे उंचच उंच थर लागतात . ६ ते ७ फुटांच्या उंचीवर येथे हंड्या टांगल्या जातात . नवनाथ भक्त हंडीभोवती गोलाकार जमतात .त्यानंतर पारंपरिक पद्धतीनुसार ही दहीहंडी एका काठीने फोडली जाते. जमलेल्या गोविंदांना आसुडाचे (जाडा दोरखंड) फटके मारले जातात. हा
![]() |
पनवेल ची दहीहंडी |
एक परंपरेचाच भाग आहे . पनवेल मध्ये बापट वाडा , लाईन आळी, परदेशी आळी या भागात अशा प्रकारची दहीहंडी पाहायला मिळतात.
जवळपास ३०० वर्षांपासून पनवेल तालुक्यातील अनेक गावांमध्ये अशी पारंपरिक पद्धतीने दहीहंडी साजरी करतात .
गावची दहीहंडी
![]() |
गाव ची दहीहंडी |
आमच्या येथे कोळखे गावात हि अशाच प्रकारची हंडी पाहायला मिळते. नारळी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसापासून गावातील मंदिरात हरिनाम सप्ताह बसवला जातो . श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे ८ दिवस पूजन केले जाते . गोपाळकाल्याच्या दिवशी काल्याच्या महाप्रसादाने या सप्तहाची सांगता होते . या सात दिवसात मंदिरात भजन , कीर्तन , हरिपाठ असे भक्तिमय वातावरण असते . या संपूर्ण आठवड्यात आळीपाळीने गावातील प्रत्येकजण मंदिरातील वीणेचे वादन करीत असतो , सप्ताह बसल्यापासून गोपाळकाल्यापर्यंत वीणा खाली न ठेवण्याची प्रथा आहे . गोपाळकाल्याच्या दिवशी पारंपरिक पद्धतीनुसार दहीहंडी एका काठीने फोडली जाते. जमलेल्या गोविंदांना आसुडाचे (जाडा दोरखंड) फटके मारले जातात.
" देवाची हंडी '' असे या दहीहंडीला म्हणतात .
सर्वांन गोकुळ अष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा...
राम कृष्ण हरी 🙏🏻🌺
![]() |
नवनाथ भक्त |
ही प्रथा आजकाल कमी होत चालली आहे आणि तुमच्या गावकरी मंडलाने ती जपून ठेवली. तुमच्या गावातील दहीहंडी प्रत्यक्षात बघायला आवडेल. खुप सुंदर लेख लिहलाय. 👌🏻👌🏻
ReplyDeleteThank you , glad you like it 😊❤
Deleteअप्रतिम 😍👍
ReplyDeleteThank you 😊❤
DeleteAmazing blog �� Jay shri krishna ��
ReplyDeleteSurekh lihlay👌🏻👌🏻👌🏻 Good hoin 👍🏻👍🏻
ReplyDelete